आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’

आमची’ कराची आणि तेथील
’नारायण जगन्नाथ हायस्कूल’
आणि ’गणेशोत्सव’










कराची ही सिंध प्रांताची
राजधानी होती आणि सिंधच्या
शैक्षणिक विकासासाठी मुंबईच्या
नारायण जगन्नाथ या शिक्षकाला
तिथे खास बोलावण्यात आले होते.
त्यांच्याच नावे सिंध मधील पहिली
शाळाही सुरू झाली. आजही कराचीत
‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ चालू आहे..
स्वातंत्र्यपूर्व मुंबई (बॉम्बे) इलाख्यात
सिंध प्रांतातील कराचीचा समावेश
होता. तेव्हा कराची शहरामध्ये व्यापार-
उदीमानिमित्त अनेक मराठी माणसे  
स्थायिक झाली होती. पाकिस्तानात
स्थायिक असलेल्या मराठी मंडळींनी
मराठी संस्कृतीचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य
म्हणजे गणेशोत्सव हे मात्र अजूनही
अत्यंत हौसेने नैष्ठेने जोपासलेले दिसते.
मुंबईत एका पक्षाच्या धाकानं एका
दुकान मालकानं आपल्या दुकानाच्या
नावातील ‘कराची’ हे नाव काढून टाकलं.
पण आज जसं आपण तार स्वरात
‘आमची मुंबई’ म्हणतो तीच भावना
कराची बाबतही अनेकांची होती.
फाळणी आधी कराचीत २५ हजार
मराठी लोक रहात होते. बांधकाम, शिक्षण,
वैद्यकीय अशा क्षेत्रांत ते होते.कराचीत मराठी
चित्रपट झळकत होते. सिंधी, पंजाबी,
गुजराथी, मराठी लोक संस्कृतीचा प्रभाव
कराची वर होता.फाळणी आधी कराची
मुंबई प्रांतातच प्रशासकीयदृष्टय़ा जोडलेले
होते. कोकण आणि पुण्यातून अनेक कुटुंबे
कराचीत स्थलांतरित झाली होती. लक्ष्मुंबाई
टिळकांच्या ‘स्मृतीचित्रे’ मध्येही कराचीतील
वास्तव्याचे खुमासदार वर्णन आहे.कराची ही
सिंध प्रांताची राजधानी होती आणि सिंधच्या
शैक्षणिक विकासासाठी मुंबईच्या नारायण
जगन्नाथ या शिक्षकाला तिथे खास
बोलावण्यात आले होते. त्यांच्याच नावे
सिंधमधील पहिली शाळाही सुरू झाली.
आजही कराचीत ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’
सुरू आहे.
उन्हाळ्याच्या सुटीत कराचीच्या बंदरावरून
बोट पकडून मुंबईचे बंदर गाठायचे
आणि मग कोकणात आपल्या गावी जायचे,
हा अनेक मराठी कुटुंबांचा तेव्हाचा रिवाजच होता.
कराचीचे विद्यार्थीही मुंबईच्या विल्सन
कॉलेजात बोटीने येत असत. फाळणीनंतर
मराठी जन आपली घरे मागे टाकून भारतात आले. 
त्यातील कित्येकांनी दिल्लीतही आसरा घेतला.
फार तुरळक मराठी लोक कराचीतच राहिले.
सध्या कराचीच्या लोकसंख्येत १२.८१ टक्के
 ‘अन्यभाषिक’ गटात मराठी लोकही आहेत.तेथील
 महादेव मंदिरात दरवर्षी दीड दिवसाचा गणेशोत्सवही
 मराठी पद्धतीने साजरा होतो.कराचीतल्या विविध
 देवळांत पुजारी म्हणून गेली चार दशकेधार्मिक विधी 
करणारे मोहन गायकवाड हे भाद्रपद चतुर्थीला 
गणपतीची पूजा करतात.

‘द डेली टाइम्स’ या पाकिस्तानी वृत्तपत्राला
गायकवाड यांनी सांगितले की, कराचीतल्या
 या उत्सवासाठी पाकिस्तानातल्या अन्य भागांतील
मराठी लोकही आवर्जून येतात.मंडप उभारला
जातो, मोदक केले जातात, लोक गाणी गातात,
आरत्या म्हणतात, नाचतात. या पूजेच्या निमित्ताने 
आपल्या लोकांना भेटता येते आणि खूप आनंद
वाटतो, असे अनेकांनी सांगितले. दीड दिवसाच्या
 गणपतीचे मग अरबी समुद्रात यथाविधी विसर्जनही
केले जाते. आज कराचीतील मराठी लोकांनी
 अतिशय प्रतिकूल सांस्कृतिक परिस्थितीतही आपली मराठी
भाषा वा संस्कृती टिकविण्याची धडपड सुरू ठेवली आहे.
कराचीतील मराठीभाषकांत आणखी एक वर्ग
आहे तो बेनेइस्त्रायलींचा.कराचीतील ६३०
बेनेइस्त्रायली कुटुंबे अन्य भागांत विखुरली.
झियांच्या कारकिर्दीतील हिंसक विरोधानंतर
त्यातील कित्येकांनी आपली धार्मिक ओळख
लपविली आहे. कित्येक पार्शी असल्याचेही भासवत आहेत. 
मात्र घरात ते उर्दू व मराठीत बोलतात. माणूस आपला
 नांदता गाव मागे टाकतो तेव्हा त्याच्या
उरात एक जखमभळभळत असते.
त्या गावाची याद जागवत मग कुठे 
‘कराची सोसायटी’ उभी राहते तर कुडाळसारख्या गावात
 ‘कराची महाराष्ट्रीयन शिक्षण प्रसारक मंडळ’बहरते. 
दुरावलेल्या गावाचं नाव जपलं जाते भावविश्वाचा
 निखळलेला दुवा जपण्याची वेडी
धडपड म्हणून. फाळणीनंतर भारतात परतलेल्या
 कराचीकरांच्या मनात आजही अस्फृट स्थानआहे
आता प्रस्तुत नकाशा उघडून पाहून तशी शाळा
 खरोखरीच कराचीमध्ये असल्याची आपण खात्री
करून घेऊ शकतो, मनोमन तिला भेट देऊ शकतो. 
त्यामुळे मराठी मनाला आनंद व अभिमान लाभेल
.http://maps.google.com/maps?hl=en&client=firefox-a&ie=UTF8&q=Narayan+Jagannath+High+School&fb=1&hq=narayan+highschool&hnear=Karachi,+Pakistan&cid=16180522888875221318&ei=TFG5TI6QOILIvQO36sy4DQ&ved=0CBMQnwIwAA&ll=24.862144,67.01883&spn=0.00118,0.002747&t=h&z=19&iwloc=A
स्फूर्ती घेऊन आम्ही विकीपीडियावरील प्रकृत शाळेविषयीचा
 खालील दुवा शोधून काढला आहे..
http://en.wikipedia.org/wiki/Narayan_Jagannath_High_School
पाकिस्तानातील मंडळींनी अभिमानाने
 प्रस्तुत लेख विकिपीडियावर
चढवलेला दिसतो आहे.
त्यात असे लिहिले आहे:.
Narayan Jagannath High SchoolFrom Wikipedia, 
the free encyclopediaThe Narayan Jagannath High 
Schoolat Karachi was the first government school 
established in Sindh.It was opened in October 1855
 with 68 boys. The original buildings were replaced
 by the present ones in 1876.In March 1916, the school
 had 477 students, of whom 350were Hindus, 32 Brahmins, 
10 Jains, 12 Muslims, 66 Parsis and seven Indian
 Jews.Notable alumni include Jamshed Nusserwanjee
 Mehta, who was elected a councilor of Karachi in1918, 
and the president of the Council in 1922. He became the
 first mayor of Karachi in 1933 when the Karachi Municipal
 Corporationwas formed..

Pakistani Marathis celebrate Ganesh Pooja

स्वातंत्र्यपूर्व मुंबई (बॉम्बे) इलाख्यात सिंध प्रांतातील कराचीचा समावेश होता.
 तेव्हा कराची शहरामध्ये व्यापार-उदीमानिमित्त अनेक मराठी माणसे स्थायिक
 झाली होती. आजमितीला त्यापैकी फारच कमी (सुमारे २५०००) राहिली आहेत. 
पण पाकिस्तानात स्थायिक असलेल्या मराठी मंडळींनी मराठी संस्कृतीचे 
व्यवच्छेदक वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव हे मात्र अजूनही अत्यंत हौसेने व
 निष्ठेने जपलेले दिसते.

पाकिस्तानच्या ’paklinks.com’ या संकेतस्थळाच्या’गपशप’ या सदरामधून.
I knew there was a large Marathi speaking population inKarachi 
as it was a part of the Bombay presidency. After partition many 
Marathi speakers, mainly Hindus, migrated to India. Though 
Marathi Muslims migrated to Pakistan, new generation 
has switched to Urdu. I dint knew that there still were quite
 a few Marathis in Pakistan.संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचू शकता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.